पालघर प्रकरणात धर्माचं राजकारण करु नये, तपास CIDकडे सोपविण्यात आलाय : CM ठाकरे


मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा राज्याच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री ठेकारेंनी पालघरच्या दुर्दैवी घटनेवर भाष्य केले. पालघर प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडे सोपवला असून. या हत्येत  शामिल असणाऱ्या सर्व आरोपींना कोर्टात दाखल करून आता पोलीस कोठडीत ठेवण्यात असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली.


ते म्हणाले की, पालघरमध्ये घडलेली घटना लांछनास्पद आहे.  गेल्या पाच वर्षातही आपल्या राज्यात मॉब लिंचिंग झालं. मुळात जिथे घडलं तो भाग पालघरपासून ११० किमी अंतरावर आहे. दोन साधू दुर्गम भागातून जात होते सरळ मार्गाने जाता येत नाही. हे काहीही घडवून आणण्यात आलेले नाही. जे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे तिथे काही मीटरवर दादरा नगर हवेली म्हणजे केंद्रशासित प्रदेशाची हद्द सुरु होते. तिथे त्यांना अडवलं गेलं, त्यानंतर त्यांना परत पाठवलं गेलं. तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाने त्यांची हत्या झाली.


ही घटना रात्री जेव्हा घडली तेव्हा एवढ्या रात्री पोलीस पोहचले. पहाटे पाच्या सुमारास पोलिसांनी आरोपींना पकडलं. आम्ही कारवाई केलेली आहे या प्रकरणावरुन राजकारण नको असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. जे लोक धर्माचं राजकारण करु पाहात आहेत त्यांनी ते करु नये. मी या घटनेत जात-पात-धर्म पाहिलेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. पालघर प्रकरणात १०० पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. यामध्ये नऊ मुलं अल्पवयीन आहेत त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


तसेच कोरोनाच्या देखील राज्यावर संकट आहे. रुतलेलं अर्थचक्र हळूहळू बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउन संपलेला नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. गर्दी वाढली, सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही तर पुन्हा बंधनं टाकावी लागतील. आज महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडून सहा आठवडे पूर्ण झाले आहेत, असेही ठाकरे म्हणाले.


***