बाबासाहेबांना बेइमान होणाऱ्या गद्दार लोकांसाठी ।।
56 सालीच केले माझा बापाने धर्मांतर,
पण काहींना अजून कळले नाही धर्म आणि धम्म यातील अंतर ।
मिळतायत सुखसोयी म्हणून धम्मात येऊन बसले,
पण 33 कोटी देवात अडकले ते अडकलेच ।
दरवर्षी देवी-देवतांना नारळ चढवतात आधी,
आठवतय का रे माझ्या बापाने पाच रुपयाचा हार मागितला का कधी ।
अरे एवढे सगळे देऊन त्याने कसलीच मागणी केली नाही,
फक्त बावीस प्रतिज्ञा पाळा म्हणाला कारण त्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही ।
या एका मागणीची पूर्तता तु करू नाही शकला,
पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक प्रतिज्ञा चुकला...।
दगडधोंड्याचा देव डोक्यावर घेउन मिरवतो आज,
मागचा इतिहास आठव जरा तुला कशी काय वाटत नाही रे लाज ।
जीवघेण्या गुलामीतून तुला कोणी बाहेर काढले,
तुझा देव बसला बघत बाबासाहेब मात्र धावले ।
त्यांनी केलेल्या उपकाराची ही अशी परतफेड करतोयस,
22 प्रतिज्ञा लाथाडून आज आरती करायला दहीहंडी लावायला धावतोस ।
विसरलास तू त्या बापाला जाने तुझे दुःख जाणले,
रक्ताचे पाणी करून त्याने तुला माणसात आणले ।
केलीस ना गद्दारी बापाशी आता परत आमच्या येऊ नको,
कोणाचा उदो उदो करायचा तू कर, पण इथून पुढे जय भीम मात्र करू नकोस ।
बाबासाहेबांनी तुला बावीस प्रतिज्ञा दिल्या,
तू अजूनही त्या प्रतिज्ञा आचरणात नाही आणल्या ।
अशा गद्दारांना बाबांनी तर बाहेर काढले,
सन्मानाचे जीवन जगण्यासाठी माणसात बसविले ।
परंतु उकिरड्या वरचीच घाण खाण्याऱ्या गाढवांना,
आजही घाण खण्याचेच वेड लागले आहे ।
काहींनी तर आजही अस्तित्वात नसलेल्या देवी देवतांना नाकारले नाही,
त्यांच्या रूढी-परंपरा सनवार साजरे केल्याशिवाय त्यांचे समाधान होत नाही ।
चुका करणार्या काही गद्दारांनी आतातरी भानावर यावे यावे भानावर यावे यावे,
यावर्षी नाचून जयंती करण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणावे ।।
- रत्नमाला पाईकराव
सचिव वैभव शिक्षण संस्था हिंगोली.