भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्गचं, तर धर्मनिरपेक्षता आणि सौहार्द” ही भारतीयांसाठी “परिपूर्ण पॅशन”


नवी दिल्ली : कोरोना आणि पालघर प्रकरणांना देशातील काहीजण धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी भाष्य केले आहे. तर जे बाहेरचे देश भारतातील मुस्लीम समाज धोक्यात असल्याची भाषा करत आहेत, त्यांनाही नक्वी यांनी उत्तर दिले आहे.भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्ग असून, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित असल्याचं ते म्हणाले आहेत. याबाबतचे वृत्त लोकमतने दिले आहे.


ते म्हणाले की, धर्मनिरपेक्षता आणि सौहार्द” ही “राजकीय फॅशन” नसून भारत आणि भारतीयांसाठी “परिपूर्ण पॅशन” आहे. या सर्वसमावेशक संस्कृती आणि दृढ वचनबद्धतेमुळेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला विविधतेतील एकतेच्या धाग्यात बांधला आले आहे. अल्पसंख्याकांसह देशातील सर्व नागरिकांचे घटनात्मक, सामाजिक, धार्मिक हक्क ही भारताची घटनात्मक व नैतिक हमी आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या “विविधतेतील एकता” चे सामर्थ्य कमकुवत होऊ शकत नाही.


आपण दक्षतापूर्वक एकत्रित होऊन समाजात दुही माजवणाऱ्या अशा शक्तींच्या प्रचाराला पराभूत केले पाहिजे. फेक न्यूज पसरवणारे, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे. या प्रकारची षड्यंत्र रचणे आणि कोरोनाविरुद्ध देशातील सामूहिक युद्ध दुर्बल होऊ देता कामा नये.


तसेच देशातील सर्व मुस्लिम धार्मिक नेते, इमाम, धार्मिक-सामाजिक संस्था आणि भारतीय मुस्लिम समाज यांनी २४ एप्रिलपासून रमजानच्या पवित्र महिन्यात घरी राहून एकत्रितपणे प्रार्थना, इफ्तार आणि इतर धार्मिक कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही नक्वी म्हणाले.
***