दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा


हिंगोली,दि.21: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणुन सर्वत्र पाळला जातो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.


             यावेळी अपर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी यांची  उपस्थिती होती.


 


****