केंद्र सरकारनं आर्थिक पॅकेजमध्ये दुरुस्ती करावी असं मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्यांनी मांडलेले मुद्दे -
1.केंद्र सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज हे एकप्रकारचं कर्ज आहे. सरकारनं शेतकरी आणि मजुरांच्या खिशात डायरेक्ट पैसे जमा केले पाहिजेत.
2.सरकारनं कर्ज देऊ नये. सावकाराचं काम करू नये. मजुरांना कर्जाची नव्हे, तर पैशाची गरज आहे. जे त्यांच्या खिशात डायरेक्ट जमा करावेत.
3.आज भुकेल्या पोटानं रस्त्यावर चालणारे लोक भारताचं भविष्य आहे.
4.केंद्र सरकारनं आर्थिक पॅकेजचा पुनर्विचार करावा आणि मोदींनी डायरेक्ट पैसे जमा करण्याचा विचार करावा.
5.भारत संकटात सापडला आहे. आपले कोट्यवधी लोक बिना अन्नपाण्याचं रस्त्यावर हिंडत आहे. त्यामुळे मला दु:ख होत आहे.
6.रस्ते अपघातांत मजूरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे मनाला यातना होत आहे.
7.लॉकडाऊन उठवण्याचा विचार अभ्यासपूर्ण करावा लागणार आहे. हा एक इव्हेंट नाहीये. आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं आपल्याला रक्षण करायचं आहे.
8.कोरोनाच्या संकटाला आता नुकतीच सुरुवात झाली आहे. हे एक वादळ आहे, त्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. यापेक्षा मोठं वादळ आता येईल. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर मोठं संकट येणार आहे.
9.कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांचे हात बळकट करायला पाहिजे.
***